रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात ३२ वर्षीय विवाहितेने कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मृत महिलेचे नाव मेनका युवराज चव्हाण असे आहे. त्या पती युवराज चव्हाण यांच्यासह साळवी स्टॉप परिसरात वास्तव्यास होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिलच्या रात्री पती उशिरा घरी परतल्याने पती-पत्नीमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता. या वादानंतर मानसिक तणावातून मेनका चव्हाण यांनी घरात ठेवलेले उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले.
घटनेनंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याचे लक्षात येताच पती युवराज चव्हाण यांनी त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच १२ एप्रिल रोजी सकाळी ७.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात १६ एप्रिल रोजी आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत ही नोंद घेण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात असून, आत्महत्येमागील नेमकी कारणमीमांसा आणि परिस्थितीचा सखोल तपास केला जात आहे.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका क्षणिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














