राजापूर तालुक्यातील सागवे बुरुंबेवाडी येथे ३२ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आरती संदीप गुरव (वय ३२, रा. उपळे गुरववाडी, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरती गुरव या काही दिवसांपासून डोक्याच्या आजाराने त्रस्त होत्या. रविवारी सकाळी त्या बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांना वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासात दीर्घकाळच्या आजारामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची नोंद २ ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी आत्महत्येचे विचार, तीव्र निराशा किंवा मानसिक तणावाचा सामना करत असाल, तर विश्वासू व्यक्तीशी बोलणे आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा स्थानिक आपत्कालीन मदतसेवेशी त्वरित संपर्क साधणे उपयुक्त ठरू शकते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













