रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील केळवली-रोहीदासवाडी येथे २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. राजेश दिपक मोरवस्कर (वय २९, रा. केळवली-रोहीदासवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते २८ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.१५ वाजण्याच्या दरम्यान घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये घडली. राजेश मोरवस्कर यांनी शेडमधील आतील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे पाठविण्यात आला.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४८/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मयत हा दारूच्या अतिव्यसनाधीन असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
टीप: आत्महत्येची कारणे अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत निश्चित मानता येत नाहीत. पोलिसांचा तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













