रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे आवश्यक परवानगीविना खतांचा साठा करून विक्रीसाठी ठेवलेल्या खत विक्री केंद्रावर कृषी विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत ५८ हजार ९६० रुपये किमतीचा विविध प्रकारच्या खतांचा साठा जप्त करण्यात आला असून, दुकान मालक मिलिंद केशव सावंत (रा. खालगाव-जाकादेवी, ता. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खत विक्री केंद्राची तपासणी केली असता, खतांची विक्री व साठवणुकीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसतानाही दुकानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या खतांचा साठा आढळून आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ५८ हजार ९६० रुपयांचा खतसाठा जप्त केला.
या प्रकरणी राजेंद्र कुंगेर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार मिलिंद सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
प्राथमिक तपासात खत नियंत्रण आदेश तसेच खत विक्री आणि साठवणुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे विनापरवाना खत विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













