रत्नागिरी : परवानगीशिवाय खताचा साठा; कृषी विभागाची धडक कारवाई, दुकान मालकावर गुन्हा

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे आवश्यक परवानगीविना खतांचा साठा करून विक्रीसाठी ठेवलेल्या खत विक्री केंद्रावर कृषी विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत ५८ हजार ९६० रुपये किमतीचा विविध प्रकारच्या खतांचा साठा जप्त करण्यात आला असून, दुकान मालक मिलिंद केशव सावंत (रा. खालगाव-जाकादेवी, ता. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खत विक्री केंद्राची तपासणी केली असता, खतांची विक्री व साठवणुकीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसतानाही दुकानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या खतांचा साठा आढळून आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ५८ हजार ९६० रुपयांचा खतसाठा जप्त केला.

या प्रकरणी राजेंद्र कुंगेर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार मिलिंद सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

प्राथमिक तपासात खत नियंत्रण आदेश तसेच खत विक्री आणि साठवणुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे विनापरवाना खत विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *