राज्यात पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

banner 468x60

देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट पसरलेली असतानाच महाराष्ट्रात मात्र वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने यासंदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.

banner 728x90


गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली आहे.


सोमवारपासून राज्यातील उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकणपासून विदर्भापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाने गुरुवारपर्यंत हा इशारा दिला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी, अचानक येणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीकामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *