रत्नागिरीत मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटीवरील ६५ वर्षीय खलाशाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. लक्ष्मण पांडूरंग डावकरे (वय ६५, रा. पूर्णगड, ता. जि. रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डावकरे हे सडामिऱ्या, रत्नागिरी येथील दिनेश शिवाजी सावंत यांच्या मालकीच्या ‘पुष्पगंधा’ या मच्छिमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करीत होते. १९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता तांडेल सुशांत सुधाकर महाकाळ आणि इतर खलाशांसह ते मिरकरवाडा बंदरातून मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते.
समुद्रात मच्छिमारी सुरू असताना डावकरे यांना अचानक चक्कर आली आणि ते बोटीमध्ये कोसळले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच बोट तातडीने मिरकरवाडा बंदरात परत आणण्यात आली.
यानंतर डावकरे यांना खासगी वाहनातून उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. १९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ७.५८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची रात्री १०.५३ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













