लांजा तालुक्यातील उपळे बौद्धवाडी येथील रहिवासी असलेल्या ६५ वर्षीय अशोक जान कदम यांचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूर येथील शासकीय सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कदम यांनी काही दिवसांपूर्वी चुकून अथवा नजरचुकीने विषारी औषध प्राशन केले होते. औषध प्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, प्रकृतीची स्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कदम यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेची पोलीस नोंद १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०१ वाजता बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. कदम यांनी विषारी औषध नेमके कोणत्या परिस्थितीत प्राशन केले, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे उपळे बौद्धवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून घटनेच्या सर्व बाबींचा तपास केला जात असून, पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













