Breaking News
गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी खेड : व्यवस्थापन क्षेत्रात करिअरची संधी MBA / MMS प्रवेशासाठी ATMA 2026 द्वारे सुवर्णसंधी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण रत्नागिरी : उन्हाच्या तडाख्यात सरकारचा दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्येच मिळणार तीन महिन्यांचे रेशन, एप्रिल, मे, जूनचे धान्य एकत्र वाटप रत्नागिरी : नोटेच्या बदल्यात लाखांचे स्वप्न, 15 लाखांचे आमिष, 9 लाखांचा गंडा “जुन्या 5 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात 15 लाख रुपये मिळवून देतो”

खेड : मोबाईलला 4 जी नेटवर्क, पण गावात ना धड रस्ता, ना आरोग्याची सुविधा, रुग्णांचा डोलीतून प्रवास

banner 468x60

खेड तालुक्यात सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेली मौजे जैतापूर गावातील पायरीचामाळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रस्त्याच्या मुलभूत सुविधांसाठी शासन दरबारी संघर्ष करत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकही धनगरवाडी रस्त्याच्या मुलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, असे जाहीर सभांमध्ये वारंवार विधान केले होते.

, आमदारकीची टर्म संपत आली तरी स्थानिक लोकप्रतिधींना धनगरवाड्यांचा विसर पडलेला आहे. आजही तालुक्यातील अनेक धनगरवाड्या रस्त्याच्या मुलभूत सुविधांसाठी शासनदरबारी संघर्ष करत आहेत.

पायरीचामाळ धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजही रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोलिचा वापर करावा लागत आहे.

येथील मुलभूत विकासाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजाला कोणी वाली नसल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहाण्यास मिळत आहे, अशी खंत महाराणी अहिल्यादेवी समाज जिल्हा अध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *