गेल्या वर्षापासून रत्नागिरी बसस्थानकाचं काम रखडलेलं आहे मात्र नेत्यांचं याकडे दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रचारात घोषणा दमदार मात्र रत्नागिरीतील प्रवासी मात्र उन्हात असल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे नेते प्रचारात व्यस्त असून आपल्या मतांची जुळवाजुळव करत आहेत.

प्रचाराच्या सभेचा मंडप एका दिवसात उभा राहतो मात्र 50, 100 लोकांसाठी एक निवारा शेड नाही. नेत्यांना सर्वसामान्य माणसांकडे यानां लक्ष द्यायला वेळ नसल्याचं प्रवासी सांगत आहेत.
रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम रखडल्यामुळे प्रवाशांना बससाठी उन्हातान्हात उभं रहावं लागत आहे. त्यात आता रहाटाघर या बसस्थानकाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना बससाठी बसस्थानकाबाहेर उन्हातान्हात उभे रहावे लागते.
त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रत्नागिरी बसस्थानकाचे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे. बसस्थानकाचे काम सुरू झाल्यापासून प्रवाशांना बससाठी रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. बससाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे रहात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे. त्याठिकाणी एक शेड उभी करण्यात आली आहे मात्र ती शेड पुरेशी नाही.
त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रचारातून बाहेर पडून सभेचा मंडप नको पण थोडा का होईना निवारा द्या अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. मंत्री महोदय याकडे कधी लक्ष देणार हे पाहावं लागेल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













