रत्नागिरी तालुक्यातील देउड येथे घराशेजारील लाईटचा हॅलोजन बदलत असताना विजेचा तीव्र धक्का बसून १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ९ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
मृत युवकाचे नाव जयराज संजय देसाई (वय १९, रा. देउड, ता. रत्नागिरी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयराज देसाई हा आपल्या घराच्या शेजारी असलेल्या गाडीच्या शेडजवळील चालू वीजवाहिनीवरील हॅलोजन लाईट बदलण्याचे काम करत होता. यावेळी अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. धक्क्यामुळे तो खाली कोसळून बेशुद्ध झाला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला तातडीने जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सायंकाळी ४.३५ वाजता त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे देउड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जयराजच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













