मंडणगड : तालुक्यात शुक्रवारी (दि. ९ मे) झालेल्या अवकाळी तुफानी वाऱ्यासह वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले असून झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच आंबा व काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः कोंडगाव, दंडनगरी, पणदेरी आणि पेवे परिसरात आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांवरील तयार आंबा फळे तुफानी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत. काही ठिकाणी काजू झाडांचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



वादळी पावसामुळे काही भागातील घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले असून नागरिकांचेही मोठे हाल झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत.




दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून आंबा-काजू पिकांचे, मोडलेल्या झाडांचे तसेच घरांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













