रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ येथे रविवारी (५ जुलै) सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास बस (क्र. एमएच ०८ ई ९४१२) कलंडल्याची घटना घडली. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उर्मिला शिडे, नयना राणे आणि विष्णू मांजरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून प्रवाशांना मदत केली तसेच आवश्यक ती कार्यवाही केली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. बस कलंडण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
या घटनेची माहिती महेश पाटील यांनी लांजा पोलीस स्थानकात दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













