संगमेश्वर : शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवले नाही म्हणून आठवीत शिकणाऱ्या मुलीने थेट गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने वेळेवर शाळेत जाण्यासाठी उठवले नाही याचा राग येऊन आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या कसबा भेंडी येथील शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मृण्मयी गजेंद्र देशमुख वय 13 वर्षे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आईने अभ्यास कर असे सांगितल्याने त्याचा राग मनात घेऊन आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या कसबा येथील शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या दोन वर्षापासून तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसापूर्वीच संगमेश्वर तालुक्यातील येथील एक युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर आता संगमेश्वर जवळच्या कसबा येथील आठवी इयत्ता मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मृण्मयी गजेंद्र देशमुख हिला शाळेत जाण्यास वेळ झाला. आईने शाळेत जाण्यास वेळेवर उठवले नाही म्हणून तिचे आणि आईचे सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली.

आईने वेळेवर उठवले नाही याचा मनामध्ये राग घेऊन आई घरामध्ये काम करत असतानाच घराचा दरवाजा बंद करून घेतला आणि पडवीतील वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बराच वेळ मुलगी बाहेर न आल्याने आईने सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान हाक मारली मात्र हाकेला प्रतिसाद न मिळाले आईने दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला असता मुलगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.

सदरची बाब पोलिसांना समजल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या घटनेचे खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिवकुमार पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *