मागील काही दिवसांपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरु असल्याने पाणी टंचाई दूर झाली आहे. नगर पालिकेकडूनही पाणी पुरवठा नियमित सुरु झाला असून सोमवार 1 जुलै रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावे असे आवाहन नगर पालिकेने केले आहे.
पाणी टंचाईमुळे मे महिन्यात एक दिवस आड पाणी पुरवठा शहरात करण्यात येत होता. मात्र जून महिन्यामध्ये जोरदार पडलेल्या पावसामुळे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. मोठा पाऊस पडत असल्याने काही प्रमाणात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
याबाबत नागरिकांकडून तक्रारीही होत आहेत. त्यामुळे शीळ जॅकवेल आणि साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी सोमवार 1 जुलै रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगर पालिकेने घेतला आहे. त्यामुळे सोमवारी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















