लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यावेळी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनाई आदेश लागू करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले. जिल्ह्यात २७ मे ते १० जून या कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
निकालानंतर एखाद्या घटनेने तणाव निर्माण होऊन त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
मतमोजणी शांततेत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगणे फिरण्यास आली आहे. व बरोबर घेऊन मनाई करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















