मोठी बातमी दापोली : दापोलीत “3” दिवसानानंतर पाणी येणार कोकण कट्टा लाईव्हच्या बातमीनंतर नगराध्यक्ष ममता मोरेंची माहिती, कोकण कट्टा इम्पॅक्ट

banner 468x60

“आम्ही वर्षभराची पूर्ण पाणीपट्टी भरूनही आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असेल तर काय उपयोग, जर आम्ही पाणीपट्टी भरली नाही तर चारवेळा पत्र देतात पण आता पाणी नाही येत त्याची जाबाबदारी कोण घेणार, यांना पाणीपट्टी पण द्या आणि पाणी लागलं तर टँकरलाही पैसे द्यावे लागतात दुहेरी आर्थिक फटका आम्ह्यला बसतोय कोकण कट्टा लाईव्ह न्यूजने हा प्रश्न लावून धरावा अशी आमची मागणी आहे “

banner 728x90

दापोलीतील नागरिकांची ही प्रतिक्रिया आहे.
कोकण कट्टाने याबाबत बातमी प्रकाशित केली आणि याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे.

कोकण कट्टाने याबाबत सविस्तर पोल देखील घेतला यावर अनेक जणांच्या समिश्र प्रतिक्रिया आल्या.

अनेक जणांचं 6 दिवसांनंतर पाणी येतं असं म्हणणं आहे.
याबाबत आम्ही नगराध्यक्ष ममता मोरेंजवळ संपर्क केला असता

” धरणांमधील सध्या पाण्याची पातळी कमी झाली आहे.आम्ही याला तोडगा म्हणून जवळपास 51 कोटींची तरतूद केलीय. सोंडेघरमधून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा कार्यन्वित होईल. आम्ह्यलाही माहीत आहे की दापोलीकरांची गैरसोय निर्माण झालीय. पण यामध्ये अनेक त्रुटी आहेत कधी वीज नसते पाईप खराब असल्याने पाईपलाईन फुटण्याच्या अनेक घटना घडत असतात. काही गोष्टींमध्ये राजकीय दबाव आहे. अनेकवेळा निधी कमी असल्याने काम करता येत नाही. पण आम्ही २ ते ३ दिवसात दापोलीकरांना 3 दिवसाने पाणी देण्याचं नियोजन करू”

कोकण कट्टा ग्रुपमध्ये सहभागी व्हा https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

अशी माहिती दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष ममता मोरेंनी कोकण कट्टा लाईव्ह न्यूजला दिली आहे. दापोलीत सध्या पाण्याच्या नावाने बोंब सुरु आहे.

हे ही पाहा : दापोली ग्राऊंड रिपोर्ट : माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली अजून पाण्याचा पत्ता नाही,पाणी नाही म्हणून मुलांना मुंबईत पाठवते – आमदार खासदारांनो महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, कोकण कट्टा लाईव्हचा ग्राऊंड रिपोर्ट

एकीकडे अनेक गावात वाड्यांमध्ये पाणीटंचाई असताना आता खुद्द दापोलीकरांना देखील भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. अनेक गावांमध्ये पाण्याच्या नावाने बोंब असताना आता दापोलीत देखील 6 दिवसाने पाणीपुरवठा सुरु आहे.अनियमित पाणी पुरवठ्यामुळे दापोलीकर त्रस्त झालेले आहेत.

दापोलीकरांना मिळणारे पाणीही पुरेसे दिले जात नसल्याने दापोलीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नारगोली धरण हे दापोली शहराला पाणीपुरवठा करणारा एकमेव धरण आहे.

या धरणात पाणीसाठा कमी आहे. दापोलीकरांनी वेळोवेळी तक्रार दाखल करत नगरपंचायतला पाण्यासाठी मागणी केलीय मात्र दुर्लक्ष असल्याचं देखील काही नागरिकांनी म्हटलं आहे.

दापोलीच्या नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती पालिकेने थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जर नारगोली धरणात पाणीसाठा कमी असेल बांधतिवरे येथील धरणातून टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ही नागरिकांनी केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *