दापोली : दोन गावात पाण्याचे टॅंकर, पाणी टंचाईची समस्या समोर

banner 468x60

दापोली पंचायत समितीकडे उंबरशेत व केळशी या गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

त्यामुळे पाणी टंचाईची समस्या उद्भवण्यास सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


दापोली तालुक्यात काही गावांना वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. दापोली शहराला देखील दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे.

तालुक्यातील उंबरशेत व केळशी या दोन गावांनी पाण्याच्या टँकरची मागणी पं. स. कडे केली आहे. एप्रिल महिन्यात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील काही गावांमध्ये वस्त्यांमध्ये पाण्याचे योग्य नियोजन, साठवण टाक्यांमुळे पाण्याची समस्या उद्भवलेली नाही.

परंतु काही गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी पत्र आता पंचायत समितीकडे येत असल्याने पाणी टंचाईच्या झळा बसण्यास ग्रामस्थांना सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *