फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आलेला मोहराचे आता फळधारणेत रुपांतर झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंब्याचे उत्पादन अनुकुल आहे.
बाजारात दरही चांगला मिळत आहे. वाढते तापमानही आंब्यासाठी अनुकुल ठरले असून, झाडावरील आंबा काढण्यासाठी तयार होत आहे. यंदाचा आंबा हंगाम मे अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस लागवड क्षेत्रात वातावरण आंब्यासाठी पोषक ठरले आहे.
मध्यंतरी आलेले अवकाळीचे सावट दूर झाल्यानंतर किटकांपासून आंब्याचे संरक्षण करण्यासाठी बागेत फवारण्यांची खबरदारी बागायतदारांनी घेतली. लवकरात लवकर उत्पादन हाती आले तर बाजारात दर चांगला मिळतो असा बागायतदारांचा अनुभव आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे या परिसरामध्ये हापूस आंब्याच्या कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर आलेला आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष आंबे तयार होण्यास साठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा तयार झालेला आंबा मे महिन्याच्या अखेरीस बाजारात येईल.त्या दरम्यान पावसाची शक्यता असल्यामुळे त्याला दर किती मिळेल याबाबत अनिश्चितता आहे. नव्याने आलेल्या या मोहरावर वातावरणाचा किती परिणाम होतो,
यावर त्यामधून मिळणारे उत्पादन अवलंबून आहे. आवक वाढल्यास दरावर परिणाम जिल्ह्यातील हापूस लागवड असलेल्या गावातून आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात पाठवला जात आहे.
मात्र सध्यातरी आंब्याचा दर स्थिर असला तरी आवक वाढल्यास दरावर परिमाण होण्याची बागायतदारांची भीती आहे. त्यामुळे पुरवठा आणि काढणी याचा मेळ साधूनच वेगमीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबई, पुणे या शहरातील बाजारातील पेटीला तीन हजार रुपये दर मिळत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















