रत्नागिरीतील ‘या’ गावांत 144 कलम लागू; पोलिस दलाकडून खबरदारी

banner 468x60

जिल्ह्यात शिमगोत्सवाची (Shimgotsav Festival) धूम सुरू असतानाच मानपान, पूर्ववैमनस्यातून गावात वाद सुरू आहेत.

banner 728x90 banner 728x90

यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राजापूर (Rajapur) तालुक्यातील केळवडे, डोंगर या २ गावांमध्ये उत्सव काळात १४४ कलम नुसार मनाई आदेश लागू केला आहे. याशिवाय खेड तालुक्यातील धवडे, चिपळूण तालुक्यातील अलोरे नजीकच्या नांदिवसे, लांजा तालुक्यातील पूनस येथे १४४ कलम लागू करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

कोकणात शिमगोत्सव हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. अनेक गावांच्या हा सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या, अनोख्या आहेत. धूलिवंदनाच्या दिवशी या सणाचा मुख्य पहिल्या टप्प्याची सांगता होते.

गावोगावी हा शिमगोत्सव साजरा करत असताना अनेकदा गावकरी, मानकरी यांच्यात वाद होतात. त्यामुळे उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागते. गावांत निर्माण होणारे मानपानाचे वाद शिमगोत्सवात आडवे येऊ नयेत, हे वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी तेथील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जातात.

मात्र ज्या ठिकाणी वाद मिटवण्यात पोलिसांना यश येत नाही. अशा गावांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार राजापूर तालुक्यातील केळवडे, डोंगर या २ गावांमध्ये शिमगोत्सवासाठी १४४ कलम लागू केले आहे.

खेड तालुक्यातील धवडे, चिपळूण तालुक्यातील अलोरे नजीकच्या नांदिवसे, लांजा तालुक्यातील पूनस येथे १४४ कलम लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिमगोत्सवाच्या सणावर विरजण पडू नये, यासाठी पोलिस दलाने ही खबरदारी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *