तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची झळ पोहोचू लागली आहे. सातत्याने टँकर सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर तालुक्यातील पाच गावातील धनगरवाड्यात चिपळूण पंचायत समितीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
येत्या काही दिवसांत टँकरग्रस्त गावांमध्ये वाढ होणार आहे. एकीकडे जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावात कोट्यवधीच्या पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू असताना दुसरीकडे मात्र पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत आहे.
तालुक्यातील टेरव, कुडप, सावर्डे, कादवड, कोंडमळा या ठिकाणच्या धनगरवाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
परिणामी टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. येथील ग्रामस्थांनी चिपळूण पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाकडे टँकर सुरू करण्यासाठी अर्ज दिला होता.
त्यानुसार तहसीलदार कार्यालयाकडून टँकर अधिग्रहण करून या पाच गावातील धनगरवाड्यांत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















