रत्नागिरीहून (Ratnagiri) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक (Bus Caught Fire) पेट घेतला.
यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. मात्र, तरुणाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 19 प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खाजगी बसने महाड जवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला.
या बसमधील 19 प्रवाशी सुदैवाने बचावले आहे. तरुणाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशी बचावले आहेत. बसच्या टायरला आग लागल्याची बाब तरुणाच्या लक्षात आलं आणि त्याच्या प्रसंगावधानामुळे बसमधील इतर प्रवाशांचे प्राण वाचले.
मध्यरात्री जवळपास पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बसला आग लागली. बसमधील सर्व सामान जळून खाक झालं असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने 19 प्रवासी बचावले. बसच्या टायरला आग लागली आणि पुढील काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली.
पण, त्याआधी मुंबईत शिक्षण घेणाऱ्या आर्यन भाटकर या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 19 प्रवासी, दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनरचा जीव वाचला. सर्वजण गाढ झोपेत असताना बसच्या टायरने अचानक पेट घेतला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















