सावित्री नदीवरील रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जोडणारा मुंबईसाठी जवळचा मार्ग असलेल्या म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
सायंकाळी काम सुरू असताना अचानक पिलरचा स्लॅब कोसळला. सुदैवाने कामगार बाजूला सरकल्याने जीवितहानी टळली. या अपघातात 12 कामगार बचावल्याची माहिती आहे. सावित्री नदीवरील पुलाचे काही पिलर कलल्याने धोका निर्माण झाला होता,
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
त्यामुळे या पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. सावित्री नदीवरील ब्रीजच्या दुरुस्तीच्या कामाला कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत.
मात्र, पुल वाहतुकीस धोकादायक बनल्याने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुंबई, पुणे चाकरमान्याची गणपतीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गणपतीपूर्वी ब्रिज वाहतुकीला खुला करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













