मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार मुसंडी मारली असून मंगळवारी (३० जून) जिल्हाभर जोरदार पावसाची नोंद झाली. दिवसभरात जिल्ह्यात एकूण ९५०.३८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली असून सरासरी पाऊस १०५.५९ मिलीमीटर इतका राहिला.
जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १४३.७७ मिलीमीटर पाऊस झाला. गुहागरमध्ये १२७.६० मिलीमीटर, मंडणगडमध्ये १२०.२५ मिलीमीटर, संगमेश्वरमध्ये ११०.०० मिलीमीटर, राजापूरमध्ये १०६.२५ मिलीमीटर आणि दापोलीमध्ये १०५.०० मिलीमीटर पाऊस पडत या तालुक्यांनी शंभरीचा टप्पा पार केला.
चिपळूणमध्ये ८७.७७ मिलीमीटर आणि लांजामध्ये ८४.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. खेड तालुक्यात तुलनेने सर्वात कमी ६५.१४ मिलीमीटर पाऊस झाला असला, तरी तेथेदेखील पावसाची चांगली नोंद झाली आहे.
जिल्हाभर झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामाला बळ मिळाले असून भातलावणीसह शेतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. तसेच नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













