रत्नागिरी शहरातील राजीवडा नाका परिसरातील एका ३९ वर्षीय व्यक्तीचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमीर नजीर मुजावर (वय ३९, रा. घर नं. १३८५, राजीवडा नाका, ता. जि. रत्नागिरी) यांना १० जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक पोटात दुखू लागल्याने ते घरीच विश्रांती घेत होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि मानसिक स्थितीही बिघडल्याने ते गावात इकडे-तिकडे फिरत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
काही वेळानंतर ते त्यांच्या बहीण नरजहाँ नरुद्दीन बड्ये यांच्या घरी झोपण्यासाठी गेले. तेथे झोपल्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि ते अचानक बेशुद्ध पडले. ही बाब लक्षात येताच बहिणीने तातडीने नातेवाईकांना माहिती दिली.
त्यानंतर नातेवाईकांनी जमीर मुजावर यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७३/२०२६ म्हणून करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













