रत्नागिरी : तरुणाची आत्महत्या, आजारपण व व्यसनामुळे नैराश्य

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील टिके भातडेवाडी येथे ४१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सततचे आजारपण आणि दारूच्या व्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

banner 728x90

मयत मंगेश तुकाराम कांबळे (वय ४१, रा. टिके भातडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे काही काळापासून आजारपणामुळे त्रस्त होते. त्याचबरोबर त्यांना दारूचे व्यसन असल्याचेही समोर आले आहे. दि. २१ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरी कोणाच्याही नकळत गळफास घेत आत्महत्या केली.

सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. प्राथमिक तपासात आजारपण आणि व्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *