रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथील अल्पवयीन मुलगा विहिरीच्या पाण्यात बुडून अल्पवयीन आसिफचा मृत्यू झाला आहे.
शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आसिफ लतीफ शेख (वय १३,रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडे अकराच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा खेळत असताना विहिरीच्या पाण्यात पडला. नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेतला तो विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सापडला.
उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













