रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलरने 2 पादचारी महिलांना चिरडलं

banner 468x60

गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाता काही तास उलटत नाही तोवर, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे.

banner 728x90 banner 728x90

भरधाव येणाऱ्या अवजड वाहनांमुळे हे अपघात अलीकडे घडू लागले आहेत. असाच एक भीषण अपघात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यात आंजणारी येथे झाला आहे.भरधाव ट्रेलरने दोन पादचारी महिलांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

तर यातील एका ३५ वर्षे महिलेचा या अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. पल्लवी प्रकाश पेंढारी (वय ३५, रा. अंजनारी पेंढारी वाडी, ता. लांजा) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग लांजाजवळ आंजणारी घाट येथे हा मोठा अपघात झाला आहे.

या अपघातत ट्रेलर गाडी नंबर एचआर ३८ व्ही ९७९४ वरील चालक सद्दाम हकिमुदिम अन्सारी (वय २६, रा. बिहार जि. कैमुर) या वाहनाने मुंबईकडून गोवाकडे जात असताना दोन पादचारी महिला यांना धडक दिली.

या अपघातामध्ये पल्लवी प्रकाश पेंढारी यांचा जागीच मृत्यू झाला तर जयश्री धोंडीराम पेंढारी (वय ५२) या गंभीर जखमी झालेल्या आहेत.गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचाराकरता खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा येथे पाठविण्यात आलेलं आहे.

घटनास्थळी लांजा पोलिसांनी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली व जखमींना स्थानिकांच्या सहकार्याने मदत केली. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरु आहे. लांजा पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणाची कारवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *