दापोली तालुक्यात सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज 5 जुलै रविवारी जालगाव येथील चैतन्य नगर परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
चैतन्य नगर येथील रहिवासी संतोष सागवेकर यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रिक उपकरणे तसेच इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक घरात पाणी शिरल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दापोली शहर व तालुक्यातील अनेक सखल भाग जलमय झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













