संगमेश्वरच्या आरवलीत कंटेनरचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे आज गुरुवारी सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचा अपघात झाला. आरवली उड्डाणपुलाच्या अलीकडे आल्यानंतर चालकाने ब्रेक लावताच कंटेनरचा ताबा सुटून तो घसरला.

banner 728x90

या अपघातात कंटेनरचा मागील भाग रस्त्याच्या साईड वॉलवर आडवा झाला, तर पुढील इंजिनचा भाग पुलाखालून जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर उतरला. अपघाताचे स्वरूप गंभीर असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

संबंधित कंटेनर रिकामा होता. मात्र, कंटेनर महामार्गावर आडवा झाल्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी मंदावली. घटनास्थळी पोलिस व संबंधित यंत्रणा दाखल होऊन कंटेनर हटविण्याचे तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ब्रेक लावल्यानंतर कंटेनर घसरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *