रत्नागिरी : पानवल येथे दुचाकी अपघातात 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी–हातखंबा मार्गावर पानवल येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयसूर्या शांताराम मांडवकर (रा. कापडगाव, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.


banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पानवल येथील मलुष्टे यांच्या बागेसमोर घडली. जयसूर्या मांडवकर हा स्वतःच्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न (क्र. MH-08-AY-2007) या दुचाकीवरून रत्नागिरीकडून हातखंबाच्या दिशेने जात होता.

दरम्यान, भरधाव वेगात वाहन चालवत असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. परिणामी, दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट ब्लॉकवर जोरात आदळली. या भीषण अपघातात जयसूर्या याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने अपघात प्राणघातक ठरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुपेश रघुनाथ भिसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी मृत जयसूर्या मांडवकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

घटनेचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *