लांजा : परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

banner 468x60

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दोन विषयांत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून लांजा तालुक्यातील एका तरुणीने कीटकनाशक औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

banner 728x90

उपचारासाठी तिला रत्नागिरी आणि त्यानंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणीने बारावीच्या परीक्षेत ‘अकाउंट’ आणि ‘इंग्रजी’ या विषयांमध्ये कमी गुण मिळाल्याने व नापास झाल्याने ते मनावर घेतले. यातून आलेल्या तणावामुळे तिने आपल्या राहत्या घरी फवारणीचे औषध (कीटकनाशक) प्राशन केले.


घटनेनंतर तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील ॲस्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, ३० नोव्हेंबर रोजी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास तिचे उपचारादरम्यान निधन झाले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अमृ. क्र. ६४/२०२५, भारतीय न्याय (द्वितीय) संहिता १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *