दापोली : जालगाव –लष्करवाडीतील अरुंद रस्त्याचा प्रश्न सुटणार, कोकण कट्टा न्यूजच्या बातमीला मिळाला सकारात्मक प्रतिसाद

banner 468x60

जालगाव शहराला लागून असलेल्या लष्करवाडी परिसरातील अरुंद रस्त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरू होती. नागरिकांची सततची गैरसोय आणि वाढते अपघात यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत होती. अखेर या गंभीर समस्येवर तोडगा निघत असून रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

कोकण कट्टा न्यूजने दिलेल्या बातमीचा झाला थेट परिणाम

लष्करवाडीतील अरुंद मार्ग, वाढती वाहतूक, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना होणारी अडचण याबाबत ‘कोकण कट्टा न्यूज’ने सविस्तर बातमी प्रसारित केली होती.


नागरिकांच्या वेदना, अपघातांचे प्रमाण आणि रस्त्याची दुरवस्था प्रभावीपणे दाखवत ही समस्या पुढे आणली गेली.

या वृत्तानंतर प्रशासनाने त्वरित दखल घेतली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने पाहणी करून रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.

काम सुरू झाल्याने नागरिकांचा दिलासा
•लष्करवाडी परिसरातील रहिवाशांनी काम तातडीने सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
•कोकण कट्टा न्यूजने नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले आहेत.
•रस्ता रुंद झाल्यानंतर
वाहतूक सुरळीत होईल

अपघातांचे प्रमाण कमी होईल
स्थानिकांना सुरक्षित व मोकळा मार्ग मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *