दापोली : जागा विक्रीचे 40 लाख रुपये न मिळाल्याने वृद्धाची आत्महत्या, संदेश कदम आणि अमोल गुरव दोघांविरोधात गुन्हा दाखल

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे राजवाडी येथील जयंत भागोजी दुबळे (वय ८०) यांनी जागा विक्रीत मिळायचे ४० लाख रुपये न मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


३० ऑक्टोबर रोजी सकाळी दुबळे यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती त्यांच्या नातवाने दापोली पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तपास सुरु केला असता दुबळे यांच्या घरात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव (दोघे रा. हर्णे) यांनी जमीन विक्रीतील उर्वरित ४० लाख रुपये दिले नसल्याने जीवन संपवित असल्याचे नमूद केले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, दुबळे गेली दीड वर्ष या व्यवहारातील शिल्लक रक्कम मागत होते. अनेकदा दोघांकडे जाऊनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे मानसिक नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलले, असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणात संदेश कदम (४८) आणि अमोल गुरव (३९) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत. दरम्यान, रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *