दिवाळीतच मुरुड ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. मागील दहा दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा ठप्प असून नागरिकांना अक्षरशः ‘पाण्याची दिवाळी’ साजरी करावी लागत आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, पाण्याच्या समस्येबाबत ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार संपर्क साधला असता “पंप बिघडला आहे”, “पाणी कमी खेचले जात आहे” अशी केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
मार्च ते ऑगस्ट या काळात ग्रामस्थ खारे पाणी पिण्याची वेळ येते, आणि आता दिवाळीच्या अगोदरच पूर्णतः पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांचे प्रचंड हाल होत होते . ग्रामपंचायतीकडे दोन पंपांची सोय नसल्यामुळे एक पंप बंद पडला की संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा खंडित होतो.
पंप दुरुस्तीस वेळ लागतोय असे सांगण्यात येत असले तरी ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. अनेकांना पिण्याचे पाणी बाहेरून विकत घ्यावे लागत आहे.
ग्रामपंचायतीच्या या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, “ग्रामपंचायत झोपली आहे” अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















