Breaking News
रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : तिहेरी हत्याकांड प्रकरणी आणखी एका पोलिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

banner 468x60

तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत जिल्हा पोलिस दलाने प्रस्ताव दिला आहे. संबंधित कर्मचारी वाहतुक शाखेत बदली झाल्यामुळे त्या खात्याला प्रस्ताव दिला आहे. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी दलाने ही तिसरी कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांनी ही माहिती दिली.

banner 728x90 banner 728x90


बेपत्ता प्रकरणाचा तपास झाला नाही, हलगर्जीपणा केल्यामुळे ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह दोन पोलिस कर्मचारी अडचणीत आले.

बेपत्तच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी चौकशी अंती पोलिस हवालदाराला निलंबित केले आहे. राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसारच, पहिली कारवाई पोलिस उपनिरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आली.


६ जून २०२४ ला राकेश जंगम याचा खून करून त्याचा मृतदेह आंबा घाट येथे फेकून देण्यात आला होता. या खुनाच्या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशी दरम्यान राकेशची हत्या केल्याची कबुली दिली. दुर्वास पाटील याच्यासोबत या गुन्ह्यात विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. मृत राकेश जंगम हा दुर्वास पाटील यांच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता.

२१ जून २०२४ राकेशची आई जयगड पोलिस ठाण्यात राकेश बेपत्ता असल्याचा तक्रार अर्ज दिला होता. पण त्याचा अर्जाकडे दुर्लक्ष केले. पोलिसांच्या या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेऊन चौकशी अंती सोनावने नामक पोलिस हवालदाराला निलंबित केले आहे. या प्रकरणी आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करावे, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शाखेला दिला आहे. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल. या प्रकरणी आतापर्यंत एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे.

Response (1)

  1. निरीक्षकांची बदली, आणि हवालदाराच निलंबन म्हणजे अगदीच सौम्य शिक्षा झाली.. निरीक्षक जवाबदार असतो त्याला बडतर्फ करणे गरजेचे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *