चिपळूण : गणपतीसाठी गावी आलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

banner 468x60

शिरगावमध्ये तळसर परिसरातील कदमवाडी येथे गणपती सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या महेश विष्णू कदम (वय ३५) या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

banner 728x90


महेश दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता. आज (शनिवार) दुपारी साडे दोनच्या सुमारास वस्तीतील मुलांसोबत विहिरीत पोहण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडली. काही वेळ पोहताना त्याने दोन-तीनदा उडी मारली, मात्र दुर्दैवाने तो वर आला नाही.


दरम्यान, घटना लक्षात येताच भाऊ योगेश कदम यांनी धाव घेतली. मात्र विहीर खोल असल्याने शोधमोहीमेत अडचणी आल्या. बराच वेळ प्रयत्नांनंतर गळ टाकून महेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.


महेश कदम यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण तळसरमध्ये घेतले होते. गेली आठ वर्षे ते बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ वैभव (सैनिक) आणि योगेश (शेतकरी) असा परिवार आहे.


घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने तळसर कदमवाडीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *