रत्नागिरी : मिरकरवाडा येथे अमली पदार्थासह आंबेशेत येथील तरुणाला अटक

banner 468x60

रत्नागिरी शहरातील अमली पदार्थ विक्रीचा बीमोड करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरातील मिरकरवाडा येथे गस्त घालत असताना आंबेशेत येथील तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

banner 728x90

त्याच्याकडून ३० हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक. जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे दिनांक गुरुवारी रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात रत्नागिरी शहर पोलीस पथक गस्त करीत असताना, पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या उत्तर दिशेला 50 मिटर अंतरावर मोकळ्या मैदानात रात्री नऊ च्या सुमारास एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. गस्तीच्या पथकाने या इसमाचे जवळ जाऊन त्याला त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव न सांगता उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या पथकाने त्याला योग्य पोलीस बळाचा वापर करुन जागीच थांबविले व अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहित राजेंद्र चव्हाण (35 वर्षे, मुळ रा. घर नं. 1391, आंबेशेत, ता.जि. रत्नागिरी) असे सांगितले तसेच लागलीच या पथका मार्फत दोन पंचांसमक्ष त्याची अंग झडती घेण्यात आली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *