दाभोळ आणि परिसरातील आघारी, पंचनदी,कोळथरे, बोरिवली आडिवाडी,सह अनेक गावातील गेल्या ४८ तासांपासून भीषण वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.
सोमवार, २७ एप्रिल रोजी दिवसभर गेलेली वीज अद्यापही (मंगळवार सकाळपर्यंत) सुरळीत न झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकी परिस्थिती काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी गेलेली वीज रात्र होईपर्यंत आली नव्हती. सायंकाळी 8:30 च्या सुमारास केवळ १५ ते २० मिनिटांसाठी वीज पुरवठा झाला, मात्र त्यानंतर 8:30पुन्हा बत्ती गुल झाली. ती संपूर्ण रात्र आणि आज मंगळवारी सकाळ उजाडली तरी वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही.
वीज नसल्याने विहिरींचे व नळांचे पंप बंद पडले आहेत. परिणामी, अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा ठप्प झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे.
उकाड्याचा तडाखा: सध्या एप्रिल महिना असल्याने कडाक्याचे ऊन आणि आर्द्रता वाढली आहे. रात्री वीज नसल्याने लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण यांचे प्रचंड हाल झाले.
कामे खोळंबली: पिठाच्या गिरण्या, इंटरनेट सेवा आणि छोटे व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने आर्थिक नुकसानही होत आहे.
”महावितरणने दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज बंद ठेवली होती. जर दिवसभर काम केले होते, तर मग रात्री पुन्हा वीज का गेली? प्रशासनाच्या नियोजनाअभावी सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













