जहाजावर समुद्री चाच्यांनी बंधक बनवलेल्या १० खलाशांना सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीतील कुटुंबांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे (MMB) केली आहे. या जहाजावर १७ मार्च २०२५ रोजी रात्री ७:४५ वाजता मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ, सँटो अँटोनियो दो प्रिन्सिपेपासून ४० नॉटिकल मैल आग्नेय दिशेला चाच्यांनी हल्ला केला होता.

या घटनेत १० खलाशांना बंधक बनवण्यात आले असून, त्यापैकी ७ भारतीय आणि ३ रोमानियन आहेत. या बंधक खलाशांमध्ये रत्नागिरी येथील दोन तरुणांचा समावेश आहे. मिरकर समीन जावेद (OS) आणि सोलकर रिहान शब्बीर (ऑइलर) हे दोघेही रत्नागिरीचे रहिवासी असून, त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

याशिवाय, तमिळनाडू, बिहार, लक्षद्वीप आणि केरळ येथील खलाशांचाही या बंधकांमध्ये समावेश आहे.रत्नागिरीतील जावेद हसनमिया मिरकर आणि शब्बीर अ. लतीफ सोलकर यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या रत्नागिरी बंदर कार्यालयाला पत्र लिहून तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, “गेल्या दहा दिवसांपासून आम्हाला आमच्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. शिपिंग महासंचालनालयाकडून (DG Shipping) किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून अद्याप कोणतेही अपडेट्स मिळालेले नाहीत.
यामुळे आम्ही प्रचंड तणावात आहोत.”त्यांनी पुढे नमूद केले की, मर्चंट शिपिंग कायदा १९५७ च्या नियम ४ अंतर्गत DG शिपिंगची जबाबदारी येते आणि या प्रकरणात महाराष्ट्र सागरी मंडळ ही सक्षम प्राधिकरण आहे. रत्नागिरी येथे आंदोलन सुरू असल्याने हे प्रकरण त्यांच्या कार्यक्षेत्रात येते. कुटुंबीयांनी सर्व संबंधित व्यक्तींसह परराष्ट्र मंत्रालय, DG शिपिंग आणि महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश नारायण
राणे यांच्याशी तातडीने संपर्क साधून खलाशांच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्याची मागणी केली आहे. MV Bitu River (IMO क्रमांक: 9918133) हे जहाज भारतातील मॅरिटेक टँकर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे संचालित आहे. या कंपनीचा परवाना क्रमांक RPSL-MUM-162033 असून
, ती मुंबईतील गोरेगाव येथील लोटस कॉर्पोरेट पार्कमध्ये कार्यरत आहे. कंपनीचे संपर्क क्रमांक नरेश कंवर (9136443961) आणि देवेंद्र पवार (9136443972) असे आहेत. मुर्गन लक्ष्मण प्रदीप (दुसरा अधिकारी) – दिंडिगुल, तमिळनाडूसिंह संदीप कुमार (डेक कॅडेट) – धनिच्छा, बिहारसेल्वराज सतीश कुमार (तिसरा अभियंता) – करूर, तमिळनाडूअसिफ अली (AB) – मिनिकॉय बेट, लक्षद्वीपमिरकर समीन जावेद (OS) – रत्नागिरी, महाराष्ट्रसोलकर रिहान शब्बीर (ऑइलर) – रत्नागिरी, महाराष्ट्रभार्गवन राजेंद्रन (मुख्य स्वयंपाकी) – कन्हांगड,
केरळ कुटुंबांचा संदेश : “आमचे मुलं गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम आफ्रिकेत अडकली आहेत. आम्हाला मुंबईत DG शिपिंगकडे जाणे शक्य नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला विनंती करतो की, आमच्या मुलांबाबत लवकरात लवकर माहिती मिळावी,” असे कुटुंबीयांनी भावनिक आवाहनात म्हटले आहे.या घटनेने रत्नागिरीसह संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असून, खलाशांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















