रत्नागिरी : अकरावीत शिकणाऱ्या तरुणीची प्रेम प्रकरणातून आत्महत्या?

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मध्यवस्तीत एका अल्पवयीन तरुणीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही तरुणी पाली नजीकच्या गावातील असून ती अकरावी इयत्तेत शिकत होती.

banner 728x90 banner 728x90

या तरुणीचे रत्नागिरीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जाते. सदरची तरुणी ही शहरातील मारुती मंदिर व शिवाजी मैदान जवळ असणार्‍या त्या तरुणाच्या घरी आली होती. यावेळी तरुणाने तिच्याशी प्रेमाचे नाटक केल्याचे तिच्या निदर्शनास आल्याने अखेर तिने तेथेच गळफास लावून आत्महत्या केली.

सदरच्या तरुणीचा मृतदेह शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे आणण्यात आला. यावेळी सदर मुलीच्या आईने जोरजोरात किंचाळ्या केल्या. त्या ऐकून ऐकणार्‍यांनी कानावर हात घेतले, इतकी आर्त हाक होती. माझ्या मुलीला मारुन टाकले, असे ती म्हणत होती. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी या घटनेबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.


दरम्यान या प्रकरणी पोलिस तपास सुरु असून सदर मुलीच्या गावातून संतापजनक भावना व्यक्त होत आहेत. प्रेम निभावता येत नसेल तर करायचेच कशाला? असे तेथे जमलेल्या काहींनी सांगितले. यावेळी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली नसून तिला मारुन टाकले, असेही काही लोक बोलताना ऐकावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *