रत्नागिरी : वकिलानेच केला महिला वकिलाचा पाठलाग ‘ लग्नाचे काय ते सांग’

banner 468x60

रत्नागिरीमध्ये एका महिला वकिलाचा पाठलाग करुन तिला त्रास देणाऱ्या वकिलाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

banner 728x90 banner 728x90

नृपेन सिद्धार्थ कांबळे (३६, रा. देवधे, ता. लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. महिला वकिलाच्या तक्रारीनुसार, नृपेन हा मागील महिन्याभरापासून त्रास देत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिला वकिलाच्या तक्रारीनुसार, नृपेन हा सातत्याने पाठलाग करुन ‘तुझ्याशी बोलायचे आहे, दोन मिनिटे बोल, अशी विनंती करत होता.

मात्र आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे महिला वकिलाकडून स्पष्ट करण्यात आले होते. नृपेन याचा त्रास वाढत चालल्याने महिला वकिलाने या संबधी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांकडून नृपेनला समज देण्यात आली होती.

तसेच त्याच्या पालकांनी यापुढे असा प्रकार होणार नाही, अशी हमीही दिली होती. पोलिसांकडून समज देवूनही १० फेब्रुवारी रोजी नृपेन याने तक्रारदार यांचा पुन्हा एकदा पाठलाग केला. तसेच दोन मिनिटे बोलायचे आहे, माझे म्हणणे ऐकून घे, अशी विनवणी करू लागला. तसेच एकदा लग्नाचे काय ते सांग, असे बोलू लागला.

दरम्यान नृपेनच्या त्रासाला कंटाळून महिला वकिलाने रत्नागिरी शहर पोलिसांत पुन्हा एकदा तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी नृपेनविरुद्ध भारतीय न्याय संहिता ७८ (२) व ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *