Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ

रत्नागिरी : अखेर ठरलं ! राजन साळवी 3 फेब्रुवारीला भाजपात प्रवेश करणार, स्वतः मुख्यमंत्री येणार

banner 468x60

शिवसेना उबाठा गटाला कोकणातून आणखी एक धक्का बसणार आहे. उध्दव बाळासाहेब गटाचे नाराज असलेले माजी आमदार राजन साळवी आता बीजेपी मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

banner 728x90

३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा प्रवेश ३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. मागील काही दिवसांपासून राजन साळवी यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत होत्या. त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे पक्षातील अनेक अंतर्गत विवाद आणि त्यांना दिले जाणारे दुर्लक्ष. या सर्व घटकांमुळे त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख नेते म्हणून राजन साळवी यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. ते अनेक वर्षे शिवसेनेत सक्रिय होते आणि त्यांनी आमदार म्हणूनही काम केले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला होता.

बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना फुटल्यानंतर देखील राजन साळवी शिंदे गटात गेले नाहीत. राजन साळवी यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील जवळचे सबंध होते. मात्र मी कायम शिवसेनेतच राहणार असे आमदार राजन साळवी नेहमी सांगत असत.

३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा राजन साळवी यांचा भाजप प्रवेश हा कोकणातील राजकीय समीकरणात एक महत्त्वपूर्ण बदल आहे. हा प्रवेश उबाठाला आणखी एक धक्का बसणार आहे, ज्यामुळे त्यांच्या कोकणातील बळ कमी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला, भाजपला हा प्रवेश मिळाल्याने त्यांची कोकणातील स्थिती मजबूत होण्याची आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *