रत्नागिरी : बांगलादेशी महिला रत्नाागिरीत ताब्यात, पासपोर्टसह व्हिसाची मुदत संपल्याने प्रकरण आले उजेडात

banner 468x60

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथून शहर पोलिस आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत सलमा राहील बोंबल (30) या बांगला देशी महिलेला ताब्यात घेतले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पासपोर्ट तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही महिला भारतात राहात असल्याचे एटीएसच्या निदर्शानास आल्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला आहे.

दरम्यान, मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षव विनय नरवणे, पोलिस अंमलदार स्वप्नील तळेकर तसेच रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार शरद जाधव, कौस्तुभ जाधव व महिला पोलिस अपर्णा सुर्वे मिळून संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *