तालुक्यातील मोडका आगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील ११ केव्ही लाईनचे दोन खांब पूर्णपणे गंजले आहेत. ते कधीही कोसळू शकतात.
यामुळे हे पोल बदलण्याची मागणी बागायतदार महेंद्र आरेकर गेले दहा वर्ष करत आहेत. मात्र, महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मोडका आगर येथे १२ एकर जागेत आरेकर यांची नारळ, सुपारी व काजूची बाग आहे.
या ठिकाणी देखभाल, खत, पाणी देणे यासाठी कामगार आहेत. याच बागेतून महावितरणची ११ के. व्ही. ची लाईन गेली आहे. या ठिकाणचे चार विद्युत खांब गंजले आहेत. यामधील दोन खांब पूर्णत: गंजले असून, ते केव्हाही कोसळतील, अशा स्थितीत आहेत.
हे खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी आरेकर यांनी महावितरणकडे केली.गंजलेले वीज खांब बदलण्यासाठी त्यांनी गुहागर, चिपळूण व रत्नागिरी या महावितरणच्या तिन्ही कार्यालयात लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















