गुहागर : मोडका आगर येथील वीजखांब गंजलेलं

banner 468x60

तालुक्यातील मोडका आगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील ११ केव्ही लाईनचे दोन खांब पूर्णपणे गंजले आहेत. ते कधीही कोसळू शकतात.

यामुळे हे पोल बदलण्याची मागणी बागायतदार महेंद्र आरेकर गेले दहा वर्ष करत आहेत. मात्र, महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मोडका आगर येथे १२ एकर जागेत आरेकर यांची नारळ, सुपारी व काजूची बाग आहे.

banner 728x90 banner 728x90

या ठिकाणी देखभाल, खत, पाणी देणे यासाठी कामगार आहेत. याच बागेतून महावितरणची ११ के. व्ही. ची लाईन गेली आहे. या ठिकाणचे चार विद्युत खांब गंजले आहेत. यामधील दोन खांब पूर्णत: गंजले असून, ते केव्हाही कोसळतील, अशा स्थितीत आहेत.

हे खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी आरेकर यांनी महावितरणकडे केली.गंजलेले वीज खांब बदलण्यासाठी त्यांनी गुहागर, चिपळूण व रत्नागिरी या महावितरणच्या तिन्ही कार्यालयात लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *