Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

गुहागर : झोंबडी काजळीवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये आढळला मेलेला कोल्हा, ग्रा.पं.कडून आरोग्य शिबिराचे आयोजन, विहिरीची साफसफाई

banner 468x60

गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये गुरुवारी एक सडलेला कोल्हा आढळून आला. कोल्हा पाण्यात अनेक दिवस राहिल्यामुळे तो सडलेला होता आणि त्यावर जंतू निर्माण झाले होते. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आणि परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली, त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली.

banner 728x90 banner 728x90

घटना समजताच झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्य मयुरी लांजेकर, ग्रामसेवक गोरख सोनवणे, दिपक गायकवाड आणि आशासेविका साक्षी सरदेसाई यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने विहीरमधून मृत कोल्हा बाहेर काढला.

त्यांनी ग्रामस्थांना समजावून घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या. विहीरमधील पाणी उपसा करून स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे आणि कार्यकारी अभियंता दिप्ती धारप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सहाय्यक अभियंता गिरीश पापरकर व पवार यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले. विहिरीचे क्लोरिनेशन व पाण्याची तपासणी करून घ्यायची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आरोग्याची तातडीने काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कांबळे, आरोग्य केंद्र तळवलीचे अधिकारी वैभव जाधव व मदन जानवळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांसाठी शनिवार, दि. 29 रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन दिले. सरपंच अतुल लांजेकर यांनी नागरिकांची वैयक्तिक विचारपूस करत तातडीने उपाययोजना राबविण्याचे काम पाहिले असून, ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांमध्ये आरोग्य धोका टळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *