Breaking News
मोठी बातमी – TWJ घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला गुजरातमधून अटक, ठाणे पोलिसांची कोकण कट्टा न्यूजला माहिती गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी लावून धरली होती बातमी, गुतवणूकदारांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार BIG NEWS सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दापोली : शहरात उनाड गुरांचा हैदोस, व्यापारी आणि ग्राहक हैराण दापोली : हॉटेल कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, परिसरात हळहळ चिपळूण : अवैध पशुवाहतुकीवर पोलिसांची कारवाई, 14 लाखांच्या मुद्देमालासह 7 म्हशी, एका गाईची सुटका

चिपळूण : पोफळी भागातील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

banner 468x60

पोफळीतील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात यासंदर्भात पाहणी होणार आहे.



कोयना प्रकल्पाच्या बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद केली जाणार आहे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या चार गावच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी महानिर्मिती कंपनी आणि जलसंपदा विभागाला केली आहे.

banner 728x90


कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्यातील गळती काढण्याचे काम महिनाभरात सुरू होणार आहे. यासाठी १९ नोव्हेंबरपासून कोयनेच्या टप्पा १, २ ची वीजनिर्मिती बंद केली जाणार आहे. पोफळी येथील ईव्हिटीतून पोफळीसह कोंडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे गावच्या नळपाणी योजनेसाठी पाणी आणण्यात आले आहे.

त्याशिवाय महानिर्मिती कंपनीच्या कर्मचारी वसाहतीला ईव्हिटीतूनच पाणीपुरवठा होतो. गळतीचे काम करताना टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद झाल्यानंतर कोयना धरणातून पोफळी ईव्हीटीकडे येणारे पाणी बंद केले जाणार आहे. त्यामुळे या भागाला पाणी मिळणार नाही.


एक वर्षापूर्वी गळती काढण्याबाबत जलसंपदा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या त्याचवेळी संबंधित ग्रामपंचायतींना जलसंपदा विभागाने पत्र पाठवून पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली होती. आता १९ नोव्हेंबरपासून कोयनेचा टप्पा १ आणि २ बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी पर्यायी उपायोजना करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी गावातील ग्रामस्थांची बैठक झाली. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर आज जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, आमदार शेखर निकम, महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार व इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत चार गावातील संभाव्य पाणीटंचाईबद्दल तोडगा काढण्यासाठी पर्याय सुचवण्यात आले. चार गावांसाठी नवीन पाईपलाईन टाकून पाणी आणायचे झाले तर त्याला कोट्यवधी रुपयांचा खर्च आहे.

दोन महिन्यात गळतीचे काम पूर्ण होईल; पण नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम होणार नाही. त्यामुळे जुन्या योजना चालू करता येणे शक्य आहे का किंवा कोयना प्रकल्पाच्या इतर स्रोतामधून पाणी देणे शक्य आहे का, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तपणे पाहणी करावी, असे बैठकीत ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *