रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी (ता. रत्नागिरी) येथील धोकादायक उतारावर आज पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास डंपरचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MH-43 Y 5998 क्रमांकाचा डंपर जयगड येथून मुंबईकडे कोळसा घेऊन जात होता. बावनदी येथील वळणदार उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या उतारावर जाऊन पलटी झाला.
या अपघातात अलगुराय (वय ४०, रा. पाटणा, बिहार) हे जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी हातखंबा पोलीस मदत केंद्र व रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे अधिकारी तात्काळ दाखल झाले होते.
या प्रकरणी पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













