रत्नागिरी : जि. प. व पंचायत समिती निवडणूक; 7 फेब्रुवारी रोजी मतदानाच्या दिवशी शृंगारतळी , माखजन, निवळी आठवडा बाजार बंद

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणचे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

banner 728x90

बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ चे कलम ५ (ग)(क) मधील तरतुदीनुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी, संगमेश्वर तालुक्यातील माखजन,
रत्नागिरी तालुक्यातील निवळी तसेच रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार बंद राहणार आहेत.


मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *