मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथे सोमवारी सकाळी ट्रकच्या धडकेत रिक्षा उलटून तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
रत्नागिरीकडे येणाऱ्या रिक्षाला (एमएच ०८ बीसी १२१९) मागून आलेल्या ट्रकने (एमएच ०८ एपी ०७११) जोरदार धडक दिली. धडकेमुळे रिक्षा रस्त्यावर उलटली. या अपघातात चंद्रकांत रामचंद्र कांबळे (५०), मानसी चंद्रकांत कांबळे (४६) आणि नीतेश गंगाराम कांबळे (४०, तिघेही रा. हसोळ, बौद्धवाडी, ता. लांजा) हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच आरटीओ विभागातील पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













