Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

गुहागर : नगरपंचायत निवडणुकीमध्ये वडील विरुद्ध मुलगा असा सामना

banner 468x60

कौटुंबिक नातेसंबंध उत्तम असले तरीही राजकीय विचार परस्परविरोधी असतील तर एकमेकांचे नातेवाईक अगदी एका घरातच दोन पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याची उदाहरणे यापूर्वीही घडली आहेत. असाच आणखी एक प्रकार कोकणातून समोर आला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये यावेळेला वडील विरुद्ध मुलगा असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.

banner 728x90 banner 728x90


वडील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून तर त्यांच्याविरुद्ध मुलगा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. या दोघांनीही आपापले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. त्यामुळे या लढतीची सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली आहे. कोकणातील गुहागर नगरपंचायत निवडणुकीकडे हे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय ट्विस्ट कोकणात पाहायला मिळत आहेत.

कोकणात अनेक ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीमध्येही सारे काही अलबेल नाही हे स्पष्ट चित्र आहे. याचंच उदाहरण गुहागर नगरपंचायत निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. गुहागर नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 13 मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून वडील राजेंद्र अर्जुन भागडे हे नगरसेवक पदाची निवडणूक लढवीत आहेत.
त्यांच्या विरोधात त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौरभ राजेंद्र भागडे हे याच 13 नंबर वार्ड मधून निवडणूक लढवीत आहेत.

या निवडणुकीकडे संपूर्ण गुहागरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे वडील विरुद्ध मुलगा ही लढत गुहागर मध्ये मोठा उत्सुकतेचा व चर्चेचा विषय ठरला आहे.
21 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुती राज्याच्या राजकारणातील सत्तेत आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीमध्ये एकमेकांसमोरच उमेदवार उभे राहण्याचे चित्र आहे.

त्यामुळे महायुतीतील काही नेत्यांकडून महायुती मधीलच एकमेकांसमोरच एकमेकांच्या विरोधात निवडणुका झाल्या तरी त्या मैत्रीपूर्ण होतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *